अरूण साधू हे मराठी भाषेतील प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरिक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी रशिया तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थेवर विवेचक लेखन केले आहे. त्यांच अत्तापर्यंत प्रकाशित झालेलं साहित्य कादंबर्या मुंबई दिनांक । सिंहासन । बहिष्कृत । शापित । स्फोट । विप्लवा । त्रिशंकू । शोधयात्रा । तडजोड । झिपर्या । मुखवटा कथासंग्रह एक माणूस उडतो त्याची गोष्ट । बिनपावसाचा दिवस । मुक्ती । मंत्रजागर । बेचका ;;ग्लानिर्भवति भारत नाटक पडघम ललित लेखन तिसरी क्रांती समकालीन इतिहास जेव्हा ड्रॅगन जागा होतो । आणि ड्रॅगन जागा झाला । फिडेल चे आणि क्रांती । तिसरी क्रांती शैक्षणिक संज्ञापना क्रांती भाषांतर शुभमंगल (कादंबरी)
Sunday, 22 September 2013
अरूण साधू
अरूण साधू हे मराठी भाषेतील प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरिक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी रशिया तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थेवर विवेचक लेखन केले आहे. त्यांच अत्तापर्यंत प्रकाशित झालेलं साहित्य कादंबर्या मुंबई दिनांक । सिंहासन । बहिष्कृत । शापित । स्फोट । विप्लवा । त्रिशंकू । शोधयात्रा । तडजोड । झिपर्या । मुखवटा कथासंग्रह एक माणूस उडतो त्याची गोष्ट । बिनपावसाचा दिवस । मुक्ती । मंत्रजागर । बेचका ;;ग्लानिर्भवति भारत नाटक पडघम ललित लेखन तिसरी क्रांती समकालीन इतिहास जेव्हा ड्रॅगन जागा होतो । आणि ड्रॅगन जागा झाला । फिडेल चे आणि क्रांती । तिसरी क्रांती शैक्षणिक संज्ञापना क्रांती भाषांतर शुभमंगल (कादंबरी)
उत्तम कांबळे
जन्मतारीख : 31 मे 1956.
उत्तम कांबळे हे कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती. त्यांची आई शेतमजूर होती. घरात हालाखिचे दिवस होते. हातावर पोट चालणार घर.. त्यामुळे उत्तम कांबळे यांनी कंपाऊंडर, विक्रेता, हमाली, बांधकाम मजूर, ओरडून पेपर विकणे आदी सर्व कामे करत आपलं शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीचे टक्के टोणपे खात..त्यांनी स्वत:ला घडविले... पत्रकार..संपादक..लेखक म्हणून आता त्यांना जग ओळखते... त्यांनी ठाणे येथे झालेल्या ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्षपदही भुषविले... त्यांची काही विस्तारीत माहिती.
कौटुंबिक माहिती : पत्नी लता (शिक्षिका), चार्वाक व आशय हे दोन मुलगे, तसेच आई, भाऊ, बहिणी.
व्यवसाय : पत्रकार.
अनुभव :
* दै.समाज, कोल्हापूर (1979 ते 1982)
* बातमीदार, सकाळ, कोल्हापूर (1982)
* उपसंपादक (1 एप्रिल 1983 ते 30 जून 1987)
* ज्येष्ठ उपसंपादक (1 जुलै 1987)
* वृत्तसंपादक, सकाळ (नाशिक) 29 ऑगस्ट 1989.
* कार्यकारी संपादक, सकाळ (नाशिक) 21 जुलै 1992.
* संपादक : 1 मे 1994 ते 15 ऑगस्ट 2005)
* संपादक - न्यूज नेटवर्क (16 ऑगस्ट 2005 ते 9 मे 2009)
* संपादक - सकाळ माध्यम समूह (10 मे 2009 पासून)
अध्यापनाचा अनुभवः
1.शिवाजी विद्यापीठात वृत्तविद्या विभागात दोन वर्षे.
2. नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयातील वृत्तविद्या विभागात दोन वर्षे.
साहित्यलेखः *कादंबर्या (2)
1) श्राध्द - (तीन आवृत्त्या) (पहिली आवृत्ती मार्च 1986)
2) अस्वस्थ नायक - (पहिली आवृत्ती जानेवारी 2000)
*कथासंग्रह (5)
1. रंग माणसांचे - (दोन आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती 1995)
2. कथा माणसांच्या - (पहिली आवृत्ती एप्रिल 2001)
3. कावळे आणि माणसं - (पहिली आवृत्ती 1998)(दोन आवृत्त्या)
4. न दिसणारी लढाई ( पहिली आवृत्ती मे 2008)
5. परत्या (मे 2010)
*ललित (3)
1. थोडंसं वेगळं - (पहिली आवृत्ती 30 जून 2002)
2. कुंभमेळ्यात भैरू - (2003)
3. निवडणुकीत भैरू - (जुलै 2004)
*संशोधनपर ग्रंथ (5)
1. देवदासी आणि नग्नपूजा - (सात आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती - जुलै 1988)
2. भटक्यांचे लग्न - (पाच आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती - फेब्रु. १९८८)
3. कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूंचा?(दोन आवृत्त्या) (प्रथम आवृती- ऑक्टो1991)
4. अनिष्ट प्रथा - (तीन आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती - मार्च 1991)
5. वामनदादांच्या गीतातील भीमदर्शन.(सप्टेंबर 2004)
*काव्य (2)1.जागतिकीकरणात माझी कविता - (जानेवारी - 2006)
2. नाशिक तू एक सुंदर कविता - (मे - 2008)
* संपादने (7)1. गजाआडच्या कविता (पहिली आवृत्ती फेब्रुवारी 2002)(कन्नड आवृत्ती प्रसिध्द)
2. झोत ः सामाजिक न्यायावर (फेब्रुवारी 2006)
3. प्रथा अशी न्यारी (दोन आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती - मार्च 1991)
4. रावसाहेब कसबे यांचे क्रांतीकारी चिंतन (ऑगस्ट 2006)
5. शेतकर्यांच्या आत्महत्या ः एक शोध (संशोधन) (एप्रिल - 2006)
6. जागतिकीकरणातील मराठी कविता (मे - 2009)
7. जागतिकीकरणाची अरिष्टे (फेब्रुवारी - 2010)
2. झोत ः सामाजिक न्यायावर (फेब्रुवारी 2006)
3. प्रथा अशी न्यारी (दोन आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती - मार्च 1991)
4. रावसाहेब कसबे यांचे क्रांतीकारी चिंतन (ऑगस्ट 2006)
5. शेतकर्यांच्या आत्महत्या ः एक शोध (संशोधन) (एप्रिल - 2006)
6. जागतिकीकरणातील मराठी कविता (मे - 2009)
7. जागतिकीकरणाची अरिष्टे (फेब्रुवारी - 2010)
* अग्रलेखांचे संपादन (1)1) डोंगरासाठी काही फुले (जानेवारी - 2008)
* मुलाखती संपादन (1)
1) लढणार्यांच्या मुलाखती (जानेवारी - 2008)
* मुलाखती संपादन (1)
1) लढणार्यांच्या मुलाखती (जानेवारी - 2008)
* आत्मकथने (3)1. वाट तुडवतांना ः (मे 2003) - पाच आवृत्त्या
2. आई समजून घेताना ( ऑगस्ट 2006) - नऊ आवृत्त्या
3. एका स्वागताध्यक्षाची डायरी ( एप्रिल - 2008)
* पुस्तिका (10)
1. नव्या शतकात संतसाहित्य टिकेल काय? (दोन आवृत्त्या) (पहिली आवृत्ती 1998)
2. राजर्षी शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण (जुलै 2004)
3. राजर्षी शाहू महाराज आणि महिला मुक्ती (जुलै 2003)
4. महात्मा फुल्यांची जलनीती दोन आवृत्त्या) (2005)
5. जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न (सप्टेंबर 2002)
6. आंबेडकरी संमेलनातील अध्यक्षीय भाषण (जानेवारी 2006)
7. कामगार साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण (जानेवारी 2006)
8. आंबेडकरी साहित्य (अमरावतीमधील भाषण) (जानेवारी - 2008)
9. स्वागतास उभा मी-सांगली अ.भा.साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून केलेले भाषण (2008)
10. ओबीसींचे राजकारण (जुलै 2008) (चार आवृत्त्या)
* गुजरातमधील इयत्ता अकरावीच्या मराठी मुलांच्या पाठय़पुस्तकासाठी लेखन.
* गुलबर्गा विद्यापीठात आई समजून घेताना एम.ए.च्या अभ्यासकऎमासाठी
* कर्नाटकात `वाट तुडवताना' या आत्मचरित्रावर एम.फिल. पूर्ण
* कर्नाटक विद्यापीठात `वाट तुडवताना' एम.ए.च्या अभ्यासकऎमासाठी
* शिवाजी विद्यापीठात एका विद्या ्थ्याकडून एम.फिल. पूर्ण
* विजापूर महिला विद्यापीठात `आई समजून घेताना' बी.ए.च्या अभ्यासकऎमासाठी
* `पोरासाठी चार शब्द` या कवितेचे शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्याकडून
विधान परिषदेत वाचन (6-4-2010)
* `आई समजून घेताना' पुस्तकाचे अंधासाठी Talking Book ब्रेललिपीत रूपांतर,
* `आई समजून घेताना' पुस्तकाचे कन्नड व इंग्रजीतही अनुवाद प्रसिद्ध.
* `वाट तुडवतांना` या ग्रंथाचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध.
* `वाट तुडवतांना` उ.महाराष्ट्र, नांदेड आणि मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी.
* `जागतिकीकरणातील मराठी कविता` अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी
* `देवदासी आणि नग्नपूजा` या पुस्तकाचा हिंदी अनुवाद.
* चार विद्यार्थ्यांकडून पी.एचडी साठी संशोधन सुरू.
* काही कविता व कथांचा हिंदी, कन्नड, इंग्रजी व मल्याळी भाषेत अनुवाद.
* `जलसाक्षरता' प्रकल्पाची `सकाळ'च्या माध्यमातून अंमलबजावणी.
* भटके, देवदासी आदी उपेक्षितांच्या चळवळीत सहभाग.
* महाराष्टखातील एक प्रभावी वक्ता.
* अध्यक्ष.1) प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन, बुलढाणा
2) बंधुता साहित्य संमेलन, नाशिक (22 फेब्रुवारी.2004)
3) शब्दगंध साहित्य संमेलन, सांगली
4) नववे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन, वणी (यवतमाळ) (13जाने.2006)
5) तेरावे कामगार साहित्य संमेलन, अमरावती (20,21 जाने.2006)
6) दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळ्ळूर, कर्नाटक ( 4 फेब्रुवारी 2007)
7) अध्यक्ष - सहावे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन, दादर (5 सप्टे.2009)
8) 81वे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष-सांगली(18 ते 20 जाने.08)
9) उद्घाटक - नववे बंधुता साहित्य संमेलन, (23 फेब्रुवारी2008)
10) उद्घाटक - जागतिक आयुर्वेद परिषद, थायलँड (23 ऑगस्ट 2008)
11) उद्घाटक - 40 वे अंकुर साहित्य संमेलन, चाळीसगाव (4 नोव्हें.2008)
12) उद्घाटक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, नगर (21 मे.2010)
2. आई समजून घेताना ( ऑगस्ट 2006) - नऊ आवृत्त्या
3. एका स्वागताध्यक्षाची डायरी ( एप्रिल - 2008)
* पुस्तिका (10)
1. नव्या शतकात संतसाहित्य टिकेल काय? (दोन आवृत्त्या) (पहिली आवृत्ती 1998)
2. राजर्षी शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण (जुलै 2004)
3. राजर्षी शाहू महाराज आणि महिला मुक्ती (जुलै 2003)
4. महात्मा फुल्यांची जलनीती दोन आवृत्त्या) (2005)
5. जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न (सप्टेंबर 2002)
6. आंबेडकरी संमेलनातील अध्यक्षीय भाषण (जानेवारी 2006)
7. कामगार साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण (जानेवारी 2006)
8. आंबेडकरी साहित्य (अमरावतीमधील भाषण) (जानेवारी - 2008)
9. स्वागतास उभा मी-सांगली अ.भा.साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून केलेले भाषण (2008)
10. ओबीसींचे राजकारण (जुलै 2008) (चार आवृत्त्या)
* गुजरातमधील इयत्ता अकरावीच्या मराठी मुलांच्या पाठय़पुस्तकासाठी लेखन.
* गुलबर्गा विद्यापीठात आई समजून घेताना एम.ए.च्या अभ्यासकऎमासाठी
* कर्नाटकात `वाट तुडवताना' या आत्मचरित्रावर एम.फिल. पूर्ण
* कर्नाटक विद्यापीठात `वाट तुडवताना' एम.ए.च्या अभ्यासकऎमासाठी
* शिवाजी विद्यापीठात एका विद्या ्थ्याकडून एम.फिल. पूर्ण
* विजापूर महिला विद्यापीठात `आई समजून घेताना' बी.ए.च्या अभ्यासकऎमासाठी
* `पोरासाठी चार शब्द` या कवितेचे शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्याकडून
विधान परिषदेत वाचन (6-4-2010)
* `आई समजून घेताना' पुस्तकाचे अंधासाठी Talking Book ब्रेललिपीत रूपांतर,
* `आई समजून घेताना' पुस्तकाचे कन्नड व इंग्रजीतही अनुवाद प्रसिद्ध.
* `वाट तुडवतांना` या ग्रंथाचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध.
* `वाट तुडवतांना` उ.महाराष्ट्र, नांदेड आणि मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी.
* `जागतिकीकरणातील मराठी कविता` अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी
* `देवदासी आणि नग्नपूजा` या पुस्तकाचा हिंदी अनुवाद.
* चार विद्यार्थ्यांकडून पी.एचडी साठी संशोधन सुरू.
* काही कविता व कथांचा हिंदी, कन्नड, इंग्रजी व मल्याळी भाषेत अनुवाद.
* `जलसाक्षरता' प्रकल्पाची `सकाळ'च्या माध्यमातून अंमलबजावणी.
* भटके, देवदासी आदी उपेक्षितांच्या चळवळीत सहभाग.
* महाराष्टखातील एक प्रभावी वक्ता.
* अध्यक्ष.1) प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन, बुलढाणा
2) बंधुता साहित्य संमेलन, नाशिक (22 फेब्रुवारी.2004)
3) शब्दगंध साहित्य संमेलन, सांगली
4) नववे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन, वणी (यवतमाळ) (13जाने.2006)
5) तेरावे कामगार साहित्य संमेलन, अमरावती (20,21 जाने.2006)
6) दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळ्ळूर, कर्नाटक ( 4 फेब्रुवारी 2007)
7) अध्यक्ष - सहावे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन, दादर (5 सप्टे.2009)
8) 81वे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष-सांगली(18 ते 20 जाने.08)
9) उद्घाटक - नववे बंधुता साहित्य संमेलन, (23 फेब्रुवारी2008)
10) उद्घाटक - जागतिक आयुर्वेद परिषद, थायलँड (23 ऑगस्ट 2008)
11) उद्घाटक - 40 वे अंकुर साहित्य संमेलन, चाळीसगाव (4 नोव्हें.2008)
12) उद्घाटक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, नगर (21 मे.2010)
सहभागः
1) अखिल भारतीय साहित य संमेलन,आळंदी (1 ते 4 फेब्रुवारी1996)
2) अखिल भारतीय साहित्य संमेलन, इंदूर (19 फेब्रुवारी2001)
पत्रकारितेसाठी त्यांना एकूण - 53 पुरस्कार मिळाले
1. उत्तम लेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार.
2. सामाजिक प्रश्नावरील लेखनासाठी `डॉ. ना. भि. परूळेकर' पुरस्कार.
3. पत्रकारितेसाठी `दर्पण' पुरस्कार. (जानेवारी - 1993)
4. अंधश्रध्दा निर्मूलन व धर्म चिकित्सेसाठी `आगरकर' पुरस्कार. (सप्टेंबर 1995)
5. सिन्नर तालुका पत्रकार संघातर्फे `प्रकाशशेठ शहा' पुरस्कार.
6. `दीन बंधू' पत्रकारिता पुरस्कार. (फेब्रुवारी 2004)
7. महाड येथील `जनार्दन मवाडे स्मृती' पुरस्कार. (मार्च - 2004)
8. भालेराव प्रतिष्ठान, जळगावतर्फे `दलित अस्मिता पुरस्कार' (फेब्रुवारी 2005)
9. महात्मा फुले समता परिषदेतर्फे `समता पुरस्कार'. (नोव्हेंबर 2005)
10. भवतु सब्ब मंगलम संस्था, मुंबईतर्फे `डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार.
11. रत्नागिरी येथील महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे `संपादक भूषण' पुरस्कार.
12. दया पवार प्रतिष्ठानतर्फे `दया पवार' साहित्य पुरस्कार.
13. पुण्यातील लोकजागर पुरस्कार (जाने.2008)
14. जगसिंगपूरमधील चंद्रभागातिरी पुरस्कार ( जानेवारी - 2008)
15. सांगलीतील प्रतिष्ठा प्रतिष्ठानचा पुरस्कार
16. पत्रकारितेसाठी सह्याद्री वाहिनीचा `नवरत्न पुरस्कार' (एप्रिल 2008)
17. पत्रकारिता व साहित्यासाठी प्रबोधनमित्र पुरस्कार, नाशिक (मे.2009)
18. इंदिरा गांधी पुरस्कार (मे 2009)
19. महाराष्ट्र गौरव पुरस्कार - आयआयटीतर्फे, मुंबई (ऑगस्ट 2009)
20 दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार - नगर (डिसें.2009)
21. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकपत्रकारिता पुरस्कार, नागपूर (डिसेंबर - 2009)
22. आशादीप पुरस्कार, पनवेल (मार्च 2010)
23. पुणे रोटरी क्लबचा व्होकेशनल पुरस्कार (मार्च 2010)
(साहित्यनिर्मितीसाठी - 30)
1. `अनिष्ट प्रथा' ग्रंथासाठी राज्य शासनाचा पुरस्कार. (मार्च - 1993)
2. `कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूं'चा साठी म.सा.प.चा केशवराव विचारे पुरस्कार (मे. 1993)
3. `श्राध्द' कादंबरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार.
4. `प्रथ ा अशी न्यारी' ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार.
5. `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी मुक्त विद्यापीठाचा `बाबूराव बागूल' पुरस्कार.(ऑक्टो.1997)
6. `रंग माणसांचे' कथासंगऎहासाठी `ग.दि.माडगूळकर' पुरस्कार.(ऑगस्ट 97)
7. लेखनाव्दारे प्रबोधन केल्याबद्दल `बंधुता' पुरस्कार.(जून 97)
8. `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `वा.ना.पंडित' पुरस्कार.
9. `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `कुसुमाग्रज' पुरस्कार.
10. सांगाती साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार, बेळगाव (मे.1999)
11. रंग माणसांचे कथासंग्रहासाठी `संत ज्ञानेश्वर' पुरस्कार. (ऑगस्ट 2001)
12. परिवर्तनवादी साहित्य प्रबोधिनीतर्फे `परिवर्तनवादी कवी' पुरस्कार.
13. `अस्वस्थ नायक` कादंबरीसाठी युगांतर प्रतिष्ठानचा `बंधुमाधव' पुरस्कार. (जाने.2001)
14. `देवदासी आणि नग्नपूजा` पुस्तकासाठी लोकायत विचार मंचचा `लोकायत' पुरस्कार.(मे 2001)
15. गजाआडच्या कविता या कैद्यांच्या संपादीत काव्यसंग्रहासाठी माचीगड (बेळगाव) येथील सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीचा `श्री गणेश स्मृती' पुरस्कार. (जानेवारी - 2003) पुरस्कार
16. `वाट तुडवताना' या आत्मचरित्राला `अस्मितादर्श' वाड्मय पुरस्कार. (फेब्रुवारी2004)
17. `वाट तुडवताना' या आत्मचरित्रासाठी राज्य शासनाचा वाडःमयनिर्मिती पुरस्कार.(डिसे.2005)
18. `वाट तुडवताना' साठी शिवगिरीजा प्रतिष्ठाणचा कदम गुरूजी पुरस्कार, कुर्डूवाडी (डिसें.2004)
19. `आई समजून घेताना' साठी स्वामीकार पुरस्कार, पुणे (एप्रिल 2008)
20. 'नाशिक तू एक सुंदर कविता' या खंडकाव्यासाठी शालिनी बनहट्टी पुरस्कार (मे.2009)
21. `आई समजून घेताना` साठी माने गुरूजी साहित्य पुरस्कार (डिसें.2006)
22. `जागतिकीकरणात माझी कविता' या काव्यसंग्रहासाठी यशवंत मनोहर पुरस्कार (जून 2007)
23 `जागतिकीकरणात माझी कवितासाठी य. चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार (फेब्रु.2008)
24. क्रांतिअग्रणी पुरस्कार, क ुंडल (डिसें.2007)
25 `आई समजून घेताना' साठी वाड्मयसेवा प्रकाशन पुरस्कार, नाशिक (मार्च 2009)
26. अक्षरगंध साहित्य पुरस्कार, प्रणव प्रतिष्ठाण, श्रीपूर, सोलापूर (डिसे.2007)
27. इस्लामपूर येथील जागर साहित्य पुरस्कार (फेब्रु.2008)
28. आचार्य अत्रे पुरस्कार - बेळगाव (ऑगस्ट - 2008)
29. `लढणार्यांच्या मुलाखतीसाठी राज्य शासनाचा डॉ.व्ही.बी.कोलते पुरस्कार (डिसें.2008)
30. कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, बोरीभडक, दौंड (मे 2010)
2) अखिल भारतीय साहित्य संमेलन, इंदूर (19 फेब्रुवारी2001)
पत्रकारितेसाठी त्यांना एकूण - 53 पुरस्कार मिळाले
1. उत्तम लेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार.
2. सामाजिक प्रश्नावरील लेखनासाठी `डॉ. ना. भि. परूळेकर' पुरस्कार.
3. पत्रकारितेसाठी `दर्पण' पुरस्कार. (जानेवारी - 1993)
4. अंधश्रध्दा निर्मूलन व धर्म चिकित्सेसाठी `आगरकर' पुरस्कार. (सप्टेंबर 1995)
5. सिन्नर तालुका पत्रकार संघातर्फे `प्रकाशशेठ शहा' पुरस्कार.
6. `दीन बंधू' पत्रकारिता पुरस्कार. (फेब्रुवारी 2004)
7. महाड येथील `जनार्दन मवाडे स्मृती' पुरस्कार. (मार्च - 2004)
8. भालेराव प्रतिष्ठान, जळगावतर्फे `दलित अस्मिता पुरस्कार' (फेब्रुवारी 2005)
9. महात्मा फुले समता परिषदेतर्फे `समता पुरस्कार'. (नोव्हेंबर 2005)
10. भवतु सब्ब मंगलम संस्था, मुंबईतर्फे `डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार.
11. रत्नागिरी येथील महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे `संपादक भूषण' पुरस्कार.
12. दया पवार प्रतिष्ठानतर्फे `दया पवार' साहित्य पुरस्कार.
13. पुण्यातील लोकजागर पुरस्कार (जाने.2008)
14. जगसिंगपूरमधील चंद्रभागातिरी पुरस्कार ( जानेवारी - 2008)
15. सांगलीतील प्रतिष्ठा प्रतिष्ठानचा पुरस्कार
16. पत्रकारितेसाठी सह्याद्री वाहिनीचा `नवरत्न पुरस्कार' (एप्रिल 2008)
17. पत्रकारिता व साहित्यासाठी प्रबोधनमित्र पुरस्कार, नाशिक (मे.2009)
18. इंदिरा गांधी पुरस्कार (मे 2009)
19. महाराष्ट्र गौरव पुरस्कार - आयआयटीतर्फे, मुंबई (ऑगस्ट 2009)
20 दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार - नगर (डिसें.2009)
21. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकपत्रकारिता पुरस्कार, नागपूर (डिसेंबर - 2009)
22. आशादीप पुरस्कार, पनवेल (मार्च 2010)
23. पुणे रोटरी क्लबचा व्होकेशनल पुरस्कार (मार्च 2010)
(साहित्यनिर्मितीसाठी - 30)
1. `अनिष्ट प्रथा' ग्रंथासाठी राज्य शासनाचा पुरस्कार. (मार्च - 1993)
2. `कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूं'चा साठी म.सा.प.चा केशवराव विचारे पुरस्कार (मे. 1993)
3. `श्राध्द' कादंबरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार.
4. `प्रथ ा अशी न्यारी' ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार.
5. `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी मुक्त विद्यापीठाचा `बाबूराव बागूल' पुरस्कार.(ऑक्टो.1997)
6. `रंग माणसांचे' कथासंगऎहासाठी `ग.दि.माडगूळकर' पुरस्कार.(ऑगस्ट 97)
7. लेखनाव्दारे प्रबोधन केल्याबद्दल `बंधुता' पुरस्कार.(जून 97)
8. `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `वा.ना.पंडित' पुरस्कार.
9. `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `कुसुमाग्रज' पुरस्कार.
10. सांगाती साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार, बेळगाव (मे.1999)
11. रंग माणसांचे कथासंग्रहासाठी `संत ज्ञानेश्वर' पुरस्कार. (ऑगस्ट 2001)
12. परिवर्तनवादी साहित्य प्रबोधिनीतर्फे `परिवर्तनवादी कवी' पुरस्कार.
13. `अस्वस्थ नायक` कादंबरीसाठी युगांतर प्रतिष्ठानचा `बंधुमाधव' पुरस्कार. (जाने.2001)
14. `देवदासी आणि नग्नपूजा` पुस्तकासाठी लोकायत विचार मंचचा `लोकायत' पुरस्कार.(मे 2001)
15. गजाआडच्या कविता या कैद्यांच्या संपादीत काव्यसंग्रहासाठी माचीगड (बेळगाव) येथील सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीचा `श्री गणेश स्मृती' पुरस्कार. (जानेवारी - 2003) पुरस्कार
16. `वाट तुडवताना' या आत्मचरित्राला `अस्मितादर्श' वाड्मय पुरस्कार. (फेब्रुवारी2004)
17. `वाट तुडवताना' या आत्मचरित्रासाठी राज्य शासनाचा वाडःमयनिर्मिती पुरस्कार.(डिसे.2005)
18. `वाट तुडवताना' साठी शिवगिरीजा प्रतिष्ठाणचा कदम गुरूजी पुरस्कार, कुर्डूवाडी (डिसें.2004)
19. `आई समजून घेताना' साठी स्वामीकार पुरस्कार, पुणे (एप्रिल 2008)
20. 'नाशिक तू एक सुंदर कविता' या खंडकाव्यासाठी शालिनी बनहट्टी पुरस्कार (मे.2009)
21. `आई समजून घेताना` साठी माने गुरूजी साहित्य पुरस्कार (डिसें.2006)
22. `जागतिकीकरणात माझी कविता' या काव्यसंग्रहासाठी यशवंत मनोहर पुरस्कार (जून 2007)
23 `जागतिकीकरणात माझी कवितासाठी य. चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार (फेब्रु.2008)
24. क्रांतिअग्रणी पुरस्कार, क ुंडल (डिसें.2007)
25 `आई समजून घेताना' साठी वाड्मयसेवा प्रकाशन पुरस्कार, नाशिक (मार्च 2009)
26. अक्षरगंध साहित्य पुरस्कार, प्रणव प्रतिष्ठाण, श्रीपूर, सोलापूर (डिसे.2007)
27. इस्लामपूर येथील जागर साहित्य पुरस्कार (फेब्रु.2008)
28. आचार्य अत्रे पुरस्कार - बेळगाव (ऑगस्ट - 2008)
29. `लढणार्यांच्या मुलाखतीसाठी राज्य शासनाचा डॉ.व्ही.बी.कोलते पुरस्कार (डिसें.2008)
30. कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, बोरीभडक, दौंड (मे 2010)
अभिजित घोरपडे
अभिजीत घोरपडे हा निसर्गाविषयी अभिरूची असलेला एक तरूण पत्रकार, निसर्गतज्ञ, व हवामानाचे अचूक मोजमापन व त्यांसंबंधीचे शास्त्रीय विश्लेषण लोकसत्ता वृत्तपत्राद्वारे वाचकांपर्यंत सोप्या शैलीत पोहोचविणारा लेखक आहे. जीवनात आतापर्यंत कितीतरी बहुआयामी कामे त्याने केलेली आहेत. काही त्याच्यामधील आभ्यासु विद्यार्थ्याला वाव देणारी, काही त्याच्यामधील प्रतिभावंत कलाकाराला न्याय देणारी तर काही त्यांच्या मधील चळवळ्या समाजसेवकाला अधिक परिपुर्ण बनविणारी. अभिजीत घोरपडे हा अतिशय दक्ष व सतत डोळ्यात तेल घालून सामाजिक अस्मितेचे रक्षण करणारा धडाडीचा पत्रकार असण्याबरोबरच तो त्याला शाहारून टाकणार्या सूंदर पक्ष्यांचा, प्राण्यांचा व नद्यांचा सच्चा मित्रदेखील आहे. जागतिकीकरणाबरोबर गहिर्या व गुंतागुंतीच्या होत चाललेल्या खंडीभर पर्यावरणीय समस्यांना त्याने त्याच्या लेखनातून नेहमीच तोंड फोडले आहे. मानवाने उच्च तंत्रज्ञानाच्या जोरावर ज्या पशुप्क्ष्यांचा आवाज दाबून ठेवला होता त्यांना अभिजीत याने विवीध कार्यक्रमांमधून व पुस्तकांमधून बोलतं केलं आहे. त्याचे फोटो काढण्यामधील कौशल्य पाहिले तरी त्यांच्यातील बहुपैलुत्व धारण केलेल्या कलाकाराची खोली कळते. सामाजिक बांधीलकी वर अपार श्रध्दा ठेविणार्या अभिजीत याने पर्यावरणीय शोषणाविरूध्द जनतेचा बुलंद आवाज निर्माण करण्याचा पणच केलाय. अभिजीत याचा जन्म डिसेंबर 5, , रोजी सातार्यात झाला. मॉडर्न हाय स्कुल पुणे येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर 1989 साली पुणे विद्यापीठ येथे त्याने पदवी शिक्षण घेतले. आशावादी स्वभाव, निसर्गप्रेमी मन, व रसिकमय झालेली वृत्ती या व्यक्तित्वगुणांमुळे तो अनेक भटकंती शिबीरांमध्ये व गिर्यारोहक सहलींमध्ये हिरीरीने सहभागी झाला होता. पत्रकारितेत घुसल्यानंतर प्रथम त्याने लोकसत्ता मध्ये हवामानाचा अंदाज देणार्या कप्प्यामध्ये आपली जागा पक्की केली. छत्रपती शिवाजी महाराज, अजय अतुल यांच्या विचारांनी व कर्तुत्वानी प्रेरित झालेल्या अभिजीतने त्याच्या कारकिर्दीमध्ये उजनी तलाव, रोहिडा गड उर्फ विचीत्रगड अशा पर्यावरणप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी मानल्या जाणार्या अनेक ठिकाणांना भेटी देवून तिथल्या ढासळत चाललेल्या संतुलनावर प्रकाश टाकला. सुंदर फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मनाला वेड लावणार्या लीलादेखील त्याने कॅमेर्यात टिपल्या. संथ वाहाते....? या नद्यांच्या सद्यस्थितीचे चित्रण करणारे त्याचे पुस्तकदेखील बरेच गाजले. हे पुस्तक लिहीण्याआधी त्याने संबंधित सर्व नद्यांची स्थानिकांनी पुरविलेल्या तपशीलांवर बारकाईने माहिती मिळवीली होती. नद्यांचे अंतरंग व बाह्यरंग अगदी कलात्मक रितीने व देखण्या फोटोंसहित उलगडयाचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न भारतभर नावाजला गेला. या पुस्तकांमुळे नदीला पाहून भक्तीने तिच्यासमोर नतमस्तक होणार्या भक्तांना आपल्या श्रध्दास्थानांची काय विदारक अवस्था झाली आहे ही इत्यंभुत माहिती मिळाली. नदीमुळे निर्माण झालेल्या संस्कृत्या, तिच्याविषयी असणार्या लोकधारणा व श्रध्दाभाव, नद्यांवरील अतिक्रमणे, नदीतून नष्ट होत चाललेली जैवविवीधता, जल प्रदुषण, व वाळुचा बेसुमार उपसा या सद्यपरिस्थीतीवर त्याने बनविलेल्या 'मरणासन्न नद्या' या स्लाईड शोला ेखील अमाप प्रसिध्दी मिळाली. या स्लाईड शो द्वारे, वरवरच्या उपाययोजनांवरती किंवा सरकारवरती विसंबुन राहण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळुन मुळ मुद्यांनाच हात घातला पाहिजे असे दर्शकांचे विचारमंथन करण्यास तो विसरला नाही. हवामानाचा अंदाज बांधणार्या रसदार लेखनाबद्दल त्याला सी. ई. ओ. अॅवॉर्ड मिळाला आहे
विद्याधर गोखले
विद्याधर गोखले
ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. ४ जानेवारी १९२४ रोजी अमरावती येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली. त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. ‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’ , ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर ‘बावनखणी’ हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. ‘गझलसम्राट गालिब’, ‘शायरेआजम’, ‘शायरीचा शालिमार’ ही गालिबचे काव य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे ‘कविकथा’ हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. ‘शंकर सुखकर हो’ हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच ष्टी देऊन जातो. गोखले यांची
लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. ‘रंगशारदा’ ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. अशा या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. ४ जानेवारी १९२४ रोजी अमरावती येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली. त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. ‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’ , ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर ‘बावनखणी’ हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. ‘गझलसम्राट गालिब’, ‘शायरेआजम’, ‘शायरीचा शालिमार’ ही गालिबचे काव य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे ‘कविकथा’ हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. ‘शंकर सुखकर हो’ हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच ष्टी देऊन जातो. गोखले यांची
लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. ‘रंगशारदा’ ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. अशा या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
बाळ ठाकरे
बाळ ठाकरे
(जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई)
मूळचे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले श्री बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक . बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. श्री बाळासाहेब ठाकरे सामना या मराठी दैनिकाचे मुख्य संपादक होते.
मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसाला मान मिळवून देण्याचं काम बाळासाहेबांच्या प्रेरणेशिवाय झालंच नसतं असे त्यांचे विरोधकही खाजगीत मान्य करतात. मुंबईहन पुण्याला ३ तासात पोहोचण्याचं स्वप्नही त्यांचेच... आणि त्यांनीते शिवशाहीच्या काळात प्रत्यक्षात उतरवलेच.
सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत.
पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना त्यांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला.
समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर, १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.
वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व आचार्य अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असतो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौर्यांमुळे १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते.
झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले.
(जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई)
मूळचे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले श्री बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक . बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. श्री बाळासाहेब ठाकरे सामना या मराठी दैनिकाचे मुख्य संपादक होते.
मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसाला मान मिळवून देण्याचं काम बाळासाहेबांच्या प्रेरणेशिवाय झालंच नसतं असे त्यांचे विरोधकही खाजगीत मान्य करतात. मुंबईहन पुण्याला ३ तासात पोहोचण्याचं स्वप्नही त्यांचेच... आणि त्यांनीते शिवशाहीच्या काळात प्रत्यक्षात उतरवलेच.
सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत.
पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना त्यांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला.
समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर, १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.
वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व आचार्य अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असतो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौर्यांमुळे १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते.
झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले.
ज्योतिबा फुले
ज्योतिबा फुले
जन्म-१८२७
मृत्यू- २८ नोव्हेंबर, १८९०
हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते.
१८२७ - जन्म कटगूण, सातारा जिल्हा
१८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६ १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात
सत्कार.
१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
१८५५ - रात्रशाळेची सुरवात केली.
१८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
१८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
१८७६ ते १८८२ - ुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.
प्रकाशित साहित्य
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी - राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३)ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकर्यांचा आसूड १८८३
६)सत्सार १ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )
९)अखंड काव्य रचना
'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. मूळ गाव - कटगुण (सातारा) गोर्हे हे मूळ आडनाव. ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणार्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव कर ून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधू' साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरवात केली. मराठीत मंगलाष्टकं रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सत्यशोधक समाजा’चे संस्थापक, आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाजसुधारक, एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतीकारक भूमिका घेणारे आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले.
महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी २० फेब्रुवारी १८२७ झाली झाला. त्यांच मूळ आडनाव गोर्हे. वडिलांचा फुलं विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या बंडखोर विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शत्त*ी आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक दर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता
विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतीकारक म्हणून ही ज्योतिबांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे ज्योतीराव एक तत्वचितक व्यत्ति*मत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
अशा समाजसुधारकाचे २८ नोव्हेंबर १८९०ला निधन झाले.
जन्म-१८२७
मृत्यू- २८ नोव्हेंबर, १८९०
हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते.
१८२७ - जन्म कटगूण, सातारा जिल्हा
१८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६ १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात
सत्कार.
१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
१८५५ - रात्रशाळेची सुरवात केली.
१८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
१८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
१८७६ ते १८८२ - ुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.
प्रकाशित साहित्य
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी - राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३)ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकर्यांचा आसूड १८८३
६)सत्सार १ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )
९)अखंड काव्य रचना
'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. मूळ गाव - कटगुण (सातारा) गोर्हे हे मूळ आडनाव. ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणार्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव कर ून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधू' साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरवात केली. मराठीत मंगलाष्टकं रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सत्यशोधक समाजा’चे संस्थापक, आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाजसुधारक, एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतीकारक भूमिका घेणारे आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले.
महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी २० फेब्रुवारी १८२७ झाली झाला. त्यांच मूळ आडनाव गोर्हे. वडिलांचा फुलं विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या बंडखोर विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शत्त*ी आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक दर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता
विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतीकारक म्हणून ही ज्योतिबांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे ज्योतीराव एक तत्वचितक व्यत्ति*मत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
अशा समाजसुधारकाचे २८ नोव्हेंबर १८९०ला निधन झाले.
महत्त्वाची सुचना
सुचना : माध्यमांचा अभ्यास करु इच्छिणारे विद्यार्थी, शिक्षक, संशोधक यांना एकाच ठिकाणी माहिती मिळावी, यासाठी या ब्लॉगवर लेखकांनी आपले लेख उपलब्ध करुन दिले आहेत. याशिवाय काही मजकूर, छायाचित्रे संकलीत करण्यात आली आहे. तथापि, ब्लॉगवर वापरलेला मजकूर, छायाचित्रे, रेखाचित्रे किंवा इतर कोणत्याही सामुग्रीमुळे कोणत्याही प्रकारच्या स्वामित्वहक्कास बाधा पोहचत आहे, असे संबंधितांना वाटत असल्यास त्यासंबंधीचा पुरेसा पुरावा जोडून पाठवावा. खात्री पटल्यानंतर हा मजकूर विनंतीनुसार तत्काळ काढण्यात येईल.
Subscribe to:
Posts (Atom)
जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय
जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...
-
जाहिरातींची माध्यमे : वृत्तपत्रे, मासिके, विशिष्ट नियतकालिके, बहि:स्थल जाहिरात (उदा., भित्तीपत्रे, प्रसिद्धिफलक, दुकानांच्या पाट्या, विजेच्...
-
१. बातमी म्हणजे काय? उत्तर: बातमी म्हणजे माहित नसलेली गोष्टा म्हणजे त्याला बातमी बोलतात. बातमी बनवताना आवश्यक असलेल्या बाबी पुढी...
-
वृत्तपत्राच्या निर्मितीत वृत्त संपादन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. बातमीसाठी जे पाच ‘क’ असतात (का, कुणी, केव्हा, कसे आणि कुठे) त्यांचा समुच्च...