Sunday 1 May 2022

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टांसाठी जनसंपर्क केला जातो. म्हणून जनसंपर्काची व्याख्या करताना, “व्यावसायिक हेतूने प्रेरित होऊन एक किंवा अनेक मानवी समूहांशी केलेला संवाद किंवा संपर्क म्हणजेच जनसंपर्क", अशी केली जाते. याशिवाय जनसंपर्काच्या आणखी काही व्याख्या आहेत. त्या अशा“निरनिराळ्या जनसमूहांचे सहकार्य मिळविण्यासाठी एखाद्या संस्थेने अथवा व्यक्तीने केलेले प्रयत्न म्हणजे जनसंपर्क" किंवा "परस्परसंवाद आणि मान्यताप्राप्त कार्यपद्धतीनुसार जनमत प्रभावित करण्यासाठी केलेला योजनाबद्ध प्रयत्न म्हणजे जनसंपर्क. "वेगवेगळ्या समूहांचे सहकार्य मिळविण्यासाठी एखादी संस्था, व्यक्ती जे प्रयत्न करते तोच जनसंपर्क. जनमत घडवणे, जनसमूहाला एखाद्या विचारावर एकत्र करणे आणि त्यासाठीचे शास्त्रीय प्रयत्न म्हणजे जनसंपर्क अशीही जनसंपर्काची व्याख्या केली जाते.'जनसंपर्क' हा एक व्यवसाय आहे. म्हणूनच डॉक्टर, वकील वगैरेंना असतात तशी तत्त्वे आणि आचारसंहिता या व्यवसायातही पाळावी लागते. या व्यवसायात काही वैयक्तिक तत्त्वे किंवा आचारसंहिता सांगितलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या व्यवसायासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. समाजाला किंवा समाजहिताला बाधा पोहोचणार नाही असे कोणत्याही व्यवसायाचे जे तत्त्व असते, तेच या व्यवसायालाही लागू पडते.

(1) जनसंपर्क व्यवसायाच्या आधारे समाजात जागरुकता निर्माण करता येते.

(2) समाजाला दिलेल्या माहितीतून समाज विचारक्षम बनायला हवा. तो भावनेच्या आणि उद्रेकाच्या आहारी जाता कामा नये.

(3) जनसंपर्काच्या कामात 'सत्य' हा मूळ आधार आहे.

(4) प्रत्येकाला आचार, उच्चार व विचार यांचे स्वातंत्र्य आहे

 (5) विचारांच्या देवाण-घेवाणींबाबत लोकशाही लागू असायला हवी.

एका विशिष्ट हेतूने समाजातील एक किंवा अनेक समूहांशी संपर्क साधणे म्हणजेच जनसंपर्क. ही जनसंपर्काची व्याख्याच जनसंपर्काचे महत्त्व अधोरेखित करते. कोणताही व्यवसाय हा एकमेकांच्या सहभागाशिवाय, सहकार्याशिवाय होत नाही आणि असे हे सहकार्य मिळविण्यासाठी जनसंपर्काचे काम आवश्यक ठरते. शासनदरबारापासून खाजगी क्षेत्रापर्यंत, राजकीय नेत्यापासून विविध आंदोलने, मोर्चापर्यंत आणि समूहांपासून व्यक्तीपर्यंत जनसंपर्काच्या कामाचा उपयोग होत असतो. जनसंपर्काचे काम पूर्वीपासूनच चालत आले आहे. विविध शास्त्रे, पुराणे, उपनिषदे, ग्रंथरचना हे जनसंपर्काचेच काम करत असत. याशिवाय गायन, नाट्य, चित्र आणि शिल्प या कलांच्या माध्यमातूनही समाजाला विशिष्ट संदेश जातो. जनसंपर्काचे कार्य साधले जाते. कीर्तन, पोवाडे, प्रवचन हीसुद्धा जनसंपर्काचीच माध्यमे होती व आहेत. अलीकडच्या काळात मात्र जनसंपर्काचे स्वरूप बदलले आहे. त्याला व्यावसायिक स्वरूप आणि आधुनिक तंत्राची जोड प्राप्त झाली आहे. असे असले तरी जनसंपर्काची आवश्यकता सर्वच क्षेत्रांत महत्त्वाची ठरते आहे.


 जनसंपर्काचे बदलते स्वरूप

पूर्वीच्या काळी समाजात सद्भावना, सहिष्णूता वाढीस लागावी, तसेच धर्माचा प्रचार व्हावा यासाठी जनसंपर्काचे साधन वापरले जात असे. त्यासाठी भजन, कीर्तन, प्रवचन, ग्रंथ, पोवाडे वगैरे माध्यमांचा आधार घेतला जात असे. अर्थातच विशिष्ट गोष्टींचा प्रचार व्हावा हाच या जनसंपर्काचा उद्देश होता. शिवाय त्याला व्यावसायिक स्वरूपही आले नव्हते. परंतु पुढे जसजसा काळ बदलत गेला तसतसे जनसंपर्काचे स्वरूपही ! या बदलाला मुख्यतः जनसंपर्काच्या बदलत्या आणि विस्तारलेल्या माध्यमांची जोड होती. विज्ञानयुगात झालेल्या बदलांनुसार माहितीची देवाणघेवाण आणि दळणवळण यांची सुविधा उदयास आली आणि वाढतच गेली. त्यातूनच वृत्तपत्रे व छापील माध्यमे, पोस्ट, तारायंत्रे, दूरध्वनी, रेडिओ, दूरचित्रवाणी, इत्यादी माध्यमांचा उदय झाला. दरम्यानच्या काळात औद्योगिक क्रांती, शिक्षणाचा प्रसार यांद्वारे नवीन व्यवसाय उदयास आले आणि पूर्वीच्या व्यवसायांचे स्वरूप बदलले. त्यांत विविध उद्योगधंदे, डॉक्टर, वकिली पेशा, बँकिंग क्षेत्र, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, सहकारी संस्था, विविध संघटना अस्तित्वात आल्या. त्यांची संख्याही वाढली. साहजिकच त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आणि या स्पर्धेतूनच खऱ्या अर्थाने प्रचार-प्रसाराची गरज निर्माण झाली आणि 'जनसंपर्क' हा व्यवसाय अवतीर्ण झाला. आपल्या व्यवसायाचा समाजात चांगल्या अर्थाने प्रचार व्हावा आणि त्यातून आपल्याबद्दल आणि व्यवसायाबद्दल समाजात चांगली प्रतिमा निर्माण व्हावी हा उद्देश आहे

प्रभावी निवेदकाचे (anchor) असा असावा

(1) चांगला आवाज

निवेदन ही गोष्टच आवाजाशी संबंधित असते. त्यामुळे निवेदकाचा आवाज चांगला असला पाहिजे. मधुर आणि प्रसन्न असला पाहिजे. कर्कश, मोठा आणि अंगावर येणारा आवाज नसावा.


(2) उच्चार स्पष्ट हवेत

निवेदकाचे उच्चार स्पष्टच असले पाहिजेत. 'न'च्या जागी 'ण' आणि 'ण'च्या जागी 'न' असा उच्चार त्याने करता कामा नये. निवेदन वाचताना त्याप्रमाणेच उच्चार केले पाहिजेत. तुमचा प्रत्येक शब्द प्रेक्षकांचे कान टिपत असतो. एखादा शब्द जरी चुकीचा उच्चारला तरी प्रेक्षकांच्या ते दीर्घ काळ लक्षात राहू शकते व तुमची प्रतिमाही तशी होण्याची शक्यता असते. बरेचदा नवीन निवेदक इतर भाषांमधील शब्द किंवा स्थळांची नावे समोर आली की चपापतात. त्यांना उच्चार काय करावा ते समजत नाही. अशा वेळी निवेदन करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधला तर ऐनवेळची फजिती टळू शकते.


(3) वाचनाची गती

निवेदन करताना सुपरफास्ट एक्सप्रेससारखेही करू नये किंवा बार्शीलाईटसारखे अत्यंत कमी वेगानेही करू नये; त्याची गती योग्य असावी. अतिसंथ निवेदन कंटाळवाणे होते तर अतिजलद निवेदन समजायला अवघड जाते. दृश्यांवरील निवेदन करताना शब्द आणि दृश्य यांत सांगड घालता आली पाहिजे. दृश्य भरभर पुढे सरकते आणि आपण सावकाश निवेदन देत राहिलो तर सर्व कार्यक्रमच फिसकटण्याची शक्यता असते. बरेचदा अशी उदाहरणे आपल्याला टीव्हीवर दिसतात.


(4) अचूक शब्दफेक


भाषेत आवाजाच्या चढउताराला खूप महत्त्व असते. आपण प्रत्येक गोष्ट एकाच आवाजाच्या पट्टीत वाचत राहिलो तर त्याची परिणामकारकता नष्ट होते. बातम्या आणि माहितीपटात अभिप्राय महत्त्वाचा नसतो; पण शब्दातील चढउताराला खूप महत्त्व असते. वाक्यातील महत्त्वाच्या शब्दांवर जोर देणे, अर्थानुसार वाक्य तोडणे, या गोष्टींना खूप महत्त्व असते. एखाद्या ठिकाणी बाँबस्फोट झाला याबाबतची बातमी देताना निवेदकाच्या डोळ्यांत पाणी आणि आवाजात गॅप असता कामा नये; तसेच एखाद्या ठिकाणी खूप चांगली घटना घडली तरी त्याची बातमी देताना आवाज अंतिजोशपूर्ण असू नये. स्वतःच्या भावना आवाजात डोकावता कामा नये; तरीही आवाजात जिवंतपणा मात्र असला पाहिजे, ही गाष्ट सरावाने आणि अभ्यासाने साध्य होते. त्यासाठी अलीकडे आवाजातील चढउतार शिकविणाऱ्या प्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या आहेत. त्यांद्वारे प्रशिक्षण घेतल्यास फायदा होतो.


(5) ठामपणा

निवेदकाच्या अंगी ठामपणा असला पाहिजे. निवेदक लेचापेचा नाही हे त्याच्या व्यक्तिमत्त्वातून दिसले पाहिजे. आत्मविश्वास ही खूप महत्त्वाची बाब आहे. निवेदन विश्वासपूर्ण असले पाहिजे. अडखळत, चाचरत, घाबरून निवेदन वाचले तर बातम्या किंवा कार्यक्रमाची रयाच जाते. कारण तिथे निवेदक सर्वांत महत्त्वाचा असतो. बरेचदा असे होते, बातम्यांचे थेट प्रेक्षपण सुरू असताना अचानक एखादी अतिमहत्त्वाची बातमी येऊन धडकते. अशा वेळी गडबडून न जाता कुशलतेने कमी महत्त्वाची बातमी वगळून ती बातमी वाचून दाखवावी लागते. इथे निवेदकाचा खरा क लागतो, इथे निवेदकाचा आत्मविश्वास उपयोगी पडतो.


(6) सामान्यज्ञानाची आवश्यकता

प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी एक महत्त्वाचा गुण असला पाहिजे, असे म्हटले जाते. तो गुण म्हणजे 'जॅक ऑफ ऑल, मास्टर्स ऑफ नन'. प्रत्येक गोष्टीची ढोबळ माहिती असली पाहिजे, असा याचा अर्थ होतो. विविध विषयांवर बातमीपत्रे प्रसारित होतात. कोणताही विषय समोर येऊ शकतो. इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, कला, आंतरराष्ट्रीय घडामोडी, इत्यादी विषय समोर येऊ शकतात. अशा वेळी आपल्याला त्या क्षेत्राचे अजिबातच ज्ञान नाही असे असता कामा नये. या क्षेत्रांची किमान तोंडओळख आणि या क्षेत्रांमधील चालू घडामोडी निवेदकाला माहीत असाव्या लागतात. वृत्तनिवेद चांगले हवे. एका चौकटीत बांधलेले नको. वृत्तनिवेदक व्हावयाचे असल्यास सामान् सतत प्रयत्न केले पाहिजेत. 


(7) व्यक्तिमत्त्व प्रभावी हवे

डोळ्यांवर झोप आणि वैराग्य, उदासीनता असलेला निवेदक रेडिओ, टीव्हीवर बातम्या द्यायला आला तर बातम्या पाहणे, ऐकणे असाध्य होते आणि बातम्यांचा प्रभावही कमी होतो. वृत्तनिवेदक थेट पडद्यावर दिसतो आणि वार्ताहर घटना स्थळावरून प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत असल्याने या दोन व्यक्तींकडे प्रेक्षकांचे पूर्ण लक्ष असते. निवेदकाचे उच्चार, शब्दांची फेक, देहबोली या बाबी चांगल्या असल्या पाहिजेत. पडद्यावर दिसण्यासाठी गोरेगोमटे आणि सुंदर दिसले पाहिजे असे नाही. नीटनेटकी राहणी व संवादकौशल्याच्या जोरावर चांगले निवेदक बनता येते. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, व्यवस्थितपणा आणि सभ्यपणा हे गुण आत्मसात केले, अंगी बाणविले, त्यांचा सराव केला तर निवेदकाच्या क्षेत्रातही उत्तम कामगिरी करता येते. निवेदनकलेचे क्षेत्र जास्तीत जास्त व्यावसायिक बनत असल्याने माफक प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय करता येऊ शकतो. वर सांगितलेले गुण सर्वांमध्ये असतातच; पण त्याला प्रशिक्षणाची जोड दिली तर माध्यमक्षेत्रात नाव कमाविता येते.

शासकीय योजनांची माहिती देणारी घडीपत्रिका ( brochure)

पूरक उद्योगांसाठी असणाऱ्या शासकीय योजनेविषयी घडीपत्रिका तयार करताना प्रथम योग्य त्या स्रोतामधून शासकीय योजनेची माहिती मिळविणे गरजेचे आहे. मिळालेली माहिती उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध लिखित माध्यमांचा आपण वापर करू शकतो. वेगवेगळ्या संस्था कृषीविषयक प्रकाशने प्रसिद्ध करीत असतात. यामध्ये हस्तपत्रिका, घडीपत्रिका, विस्तारपुस्तिका, वार्तापत्रे, मासिके यांचा समावेश होतो. आपणाला शासकीय योजनांविषयी माहिती देणारी घडीपत्रिका प्रसिद्ध करावयाची आहे. त्यासाठी प्रथम घडीपत्रिका म्हणजे काय ते जाणून घेणे आवश्यक आहे.. घडीपत्रिकेमध्ये मोठ्या व लांब कागदाला दोन, तीन किंवा चार घड्या घातलेल्या असतात. घडीपत्रिकेमध्ये सामान्यतः एकच विषय पूर्णपणे मांडलेला असतो. यामध्ये एखादी गोष्ट किंवा कृती कशी करावी, तिचे फायदे, मर्यादा यांविषयी पूर्ण व बिनचूक माहिती दिलेली असते. शासकीय • योजनांची माहिती देणारी घडीपत्रिका तयार करताना खालील बाबी लक्षात ठेवाव्यात :

(01) ही माहिती देण्यामागे आपला उद्देश काय आहे ?

(02) एका घडीपत्रिकेमध्ये एकाच योजनेची किंवा एका पूरक व्यवसायासंबंधी असलेल्या योजनांची माहिती द्या.

(03) लोकांना कोणत्या व्यवसायाशी संबंधित योजनांच्या माहितीची गरज आहे हे लक्षात घ्या.

(04) घडीपत्रिकेतील भाषा ही सोपी व ग्रामीण लोकांना समजेल अशी असावी.

(05) त्यातील वाक्ये लहान असावीत. साधारणपणे एका वाक्यात दहा शब्द असावेत.

(06) परिच्छेद लहान असावेत. एका परिच्छेदात एकच मुद्दा असावा.

(07) सर्व माहिती अचूक असल्याबद्दल खात्री करा.

(08) लिहिण्यासाठी निवडलेली योजना संक्षिप्तरित्या पूर्णपणे समाविष्ट केल्याची खात्री करा. 

(09) घडीपत्रिकेचे मुखपृष्ठ रंगीत, आकर्षक व लक्षवेधक बनवा.

(10) घडीपत्रिकेच्या शेवटी या योजनेसंबंधीची तपशीलवार अधिक माहिती कोणाकडे मिळेल त्याचा पत्ता द्या.


आवश्यक साहित्य

योजनांची माहिती देणारी घडीपत्रिका तयार करण्यापूर्वी यासंबधीच्या सर्व योजना प्रथम जाणून घ्या. त्यानंतर खात्रीलायक स्रोतामधून या योजनेची माहिती मिळवा. उदाहरणार्थ, कृषि-अधिकारी, बँकांचे अधिकारी, प्रकल्प अधिकारी, इत्यादी. या विषयावर अगोदर प्रसिद्ध झालेले साहित्


कार्यपद्धती


पूरक उद्योगासंबंधीच्या योजनांची घडीपत्रिकेसाठी माहिती संकलित करताना खालील पद्धतींचा वापर करावा.

(1) प्रथम योजनेची निवड करा.

(2) या योजनेविषयीची सविस्तर माहिती संबंधित स्रोताकडून मिळवा.

(3) घडीपत्रिकेसाठी साहित्य लिहिण्यापूर्वी आराखडा तयार करावा. प्रथम कोणती माहिती द्यावी, नंतर कोणती माहिती द्यावी व शेवटी कोणती माहिती द्यावी याची मांडणी करा.

(4) या आराखड्याप्रमाणे लिखाण करा.

(5) शीर्षक, उपशीर्षक वापरून माहितीची मांडणी करा.

(6) संपूर्ण माहिती लिहून झाल्यावर तिचे पुन्हा एकदा अवलोकन करा. एखादा मुद्दा राहिला असल्यास त्याचा अंतर्भाव करा.

Tuesday 26 April 2022

बातमीचे 'क' कार

 बातमीचे 'क' कार : बातमीत सहा 'क' कार असतात. म्हणजेच घडलेल्या घटनेतील सहा मुख्य प्रश्नांची उत्तरे सहजतेने बातमीत उपलब्ध असतात. 

★ कोण? (Who)-प्रस्तुत बातमी नेमकी कोणत्या व्यक्तीविषयी / व्यक्तींविषयी आहे. ज्यांना तिच्याविषयी माहिती असेल, त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि ज्यांना ती माहित नाही त्यांना ती माहित व्हावी अशा पद्धतीने बातमीचे लेखन करावे. 

★ कुठे? (Where) – बातमी कुठे घडली? याचा पूर्ण तपशील त्यात असावा काही स्थळे ही वेगवेगळ्या कारणांकरता प्रसिद्ध असतात. त्यामुळे हे स्थान महात्म्य त्या बातमीमधून जाणवायला हवे. 

★ केव्हा? (When)- घटना घडली ती वेळ जर वाचकाला कळली नाही. तर ती अपूर्ण माहिती असते.  घटनेचे कालवाचक गांभीर्य देखील अधोरेखित होते. 

★ काय? (What) - बातमीचा संपूर्ण तपशील या प्रश्नाभोवती तयार होतो. नेमके काय घडले. हे जर बातमीत नसेल तर तर्ककुतर्कांना भरपूर वाव मिळून

 ★ का? (Why) – जी कोणती घटना घडली त्यामागची कारणमीमांसा देणे आणि ती कारणमीमांसा बुद्धीला, तर्काला पटणारी असणे आवश्यक आहे. कारण माहित नसेल तिथे यामागचे स्पष्ट झालेले नाही, अशा नेमक्या वाचकांना सांगावे उगीच तर्क मांडू नये,

★ कसे? (How) जे काही घडले ते नेमके कसे घडले याची वाचकांना माहिती दिली म्हणजे त्यांची जिज्ञासा त्या माहितीमुळे शमते. याच सहा कारांना इंग्रजीमध्ये 5 डब्ल्यू आणि 1 H म्हणतात. या सहा 'क' कारांचा वापर एक घटना बातमीत परिवर्तित होते. 

'बातमी' म्हणजे काय व बातमीचे सर्वसामान्य निकष

इंग्रजी प्रतिशब्द News हा ज्या अक्षरांपासून तयार झाला आहे त्या अक्षरांपासूनच North, East, West आणि South या चार दिशादर्शक शब्दांची सुरुवात होते. चहूबाजूंनी घडलेल्या घटनांचे येणारे वृत्त या अर्थी हा शब्द आहे. बातमी ही सत्याधारित असावी. बातमीमधील बातमीमूल्य (News Values) ठरवण्याचे सर्वमान्य निकष पुढीलप्रमाणे आहेत 


★ अकल्पित, नाविन्यपूर्णता, अनपेक्षितता: कुत्रा माणसाला चावणे ही नेहमी घडणारी घटना आहे. त्यात अकल्पित ज्याची कल्पना करता येत नाही असे, नाविन्यपूर्ण = पूर्वी कधी घडले नाही असे अनपेक्षित ज्याची अपेक्षा केली नव्हती असे काहीही नाही. पण माणसाने कुत्र्याला चावणे ही घटना मात्र क्वचित घडणारी म्हणजेच अकल्पित, नाविन्यपूर्ण आणि अनपेक्षित अशी आहे. त्यामुळे माणसाने कुत्र्याला चावणे ही बातमीमूल्य असलेली घटना आहे.


★ समयोचितता (Timeliness) : श्रोता-वाचक-दर्शकांची नाविन्याची आस, भूक, अपेक्षा  शिळ्या बातमीने भागत नाही. घटना घडल्यानंतर तात्काळ त्याचा तपशील सामान्य वाचकांपर्यंत ( वाचकांमध्ये श्रोते व दर्शक अंतर्भूत आहेत) पोहचवली तरच ती बातमी ठरते अन्यथा त्यातील बातमीमूल्य नष्ट होते.


★ जवळीक/सामिप्य (Proximity) : बातमी ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करून भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या घटना जाणून घेण्यात व त्या घटनेचा आपल्यावर काय प्रभाव होईल. याचे अंदाज बांधण्यात अधिक रूचि असते. तर कधी कधी हे सामिप्य भावनिक पातळीवरचे सुद्धा असते. त्यामुळे या संदर्भात आपल्या वाचकवर्गाचा कल लक्षात घेऊन स्थान सामिप्य आणि भावनिक सामिप्य यावर आधारित घटनांची बातमी म्हणून निवड करावी. 


★ उत्सुकता, कुतुहल (Curiosity) : मानवी बुद्धीची जाणून घेण्याची मूक म्हणजे कुतुहल आणि ते शमवण्यासाठी माणसाच्या मनात जागृत होणारी भावना म्हणजे उत्सुकता. या दोन्हीचे शमन करणे मानसिक शांति आणि बौद्धिक स्थैर्याकरता आवश्यक असते. उत्सुकता कोणाही विषयी, कशाही विषयी असू शकते. व्यक्ति, स्थान, घटना, रहस्य, सारेच उत्सुकतेला जन्म देतात. पण जी व्यक्ति वा घटना वा जे स्थान किंवा रहस्य मानवी मनात उत्सुकता निर्माण करू शकत नाही


★ महत्त्व (Importance) : कोणत्या वाचक श्रोता दर्शकांना कशाचे महत्त्व वाटेल याचे समीकरण मांडून सर्वसाधारण उत्तर शोधून घटनेतील बातमीमूल्य जोखावे लागते. 


संवादाच्या चार प्रकाराची माहिती

 संवादशास्त्रात  महत्वाचे असून, संवादशास्त्रात संवादाचे एकूण चार प्रकार आहेत.

1. स्वयं संवाद - Intra Personal Communication

२. द्वि-व्यक्तीय - संवाद Interpersonal Communication

३. समूह संवाद -Group Communication 

४. जनसंवाद - Mass Communication.


● स्वयं किंवा आत्मसंवाद - प्रत्येक व्यक्ति स्वतःशीच संवाद साधत असतो. प्रसंगानुरूप आपल्या मनात विचार येत असतात आणि सदसदविवेकबुद्धीच्या जोरावर त्या त्या प्रसंगाचे मूल्यमापन करीत असतो. या साऱ्या प्रक्रियेत व्यक्ति स्वतःशीच बोलते. स्वतःलाच प्रश्न विचारते, स्वतःच त्याची उत्तरे देते. म्हणजे ती स्वतःच संप्रेषकाची भूमिका आणि श्रोत्याची भूमिका दोन्ही असते. या आत्मसंवादाच्या प्रक्रियेत एक आणि केवळ एकच व्यक्ति सामिल होते. आध्यात्मिक क्षेत्रात या संवादाचा प्रभाव दिसून येतो. 


● द्विव्यक्तीय संवाद - दोन आणि केवळ दोनच व्यक्तींमधील संवाद यात अभिप्रेत आहे. यात तिसरी व्यक्ति सहभागी नसते. हा संवाद व्यक्तिगत आणि निकटता निर्माण करणारा असतो. यात शब्द आणि हातवाऱ्यांची देवाणघेवाण करण्यास वाव मिळतो. हा प्रकार दोन व्यक्तींमध्येच मर्यादित राहणारा असल्यामुळे संवादाच्या क्षेत्रात सर्वाधिक सुयोग्य प्रकार मानण्यात आला आहे. या प्रकारच्या संवादामुळे व्यक्तीचे मन वळविणे तसेच त्याच्यावर प्रभाव पाडणे सहज शक्य होते. या संवादात मौखिक आणि अमौखिक संवाद साधणे आणि संवाद साधनांचा योग्य तो वापर करणे शक्य असते. तात्काळ प्रतिसाद मिळणे हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. 

दोन व्यक्तींमधील हा संवाद शारीरिक हालचालींतून मिळणाऱ्या सूचनांची देवाण घेवाण करतो. 


• समूह संवाद - दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा समूह तयार होतो. यात समूहाच्या आवश्यकतेनुसार कमी वा जास्त संख्या ठरत असते. हा संवाद नियंत्रित वातावरणात पार पडतो. यात लागणारा वेळ तो समूह किती मोठा आहे, यावर निगडीत असतो. समूहकर्त्याचे समूहातील इतरांशी कसे संबंध आहेत. यावरही बरेचसे अवलंबून असते. भाषण, कीर्तन, भजन, नाटक यात समुह संवाद घडतो. 


जनसंवाद : समूह संवादाचे मोठे स्वरुप म्हणजे जन संवाद. यामध्ये संप्रेषक आणि श्रोता यांचा थेट संवाद प्रस्थापित न होता तो एखाद्या जनसंवाद माध्यमाद्वारे प्रस्थापित होतो. थेट सवाद नसल्यामुळे संप्रेषक आणि श्रोता एकमेकांना ओळखत नाहीत. पुस्तके वर्तमानपत्रे, सिनेमा रेडिओ, टेलिव्हिजन इ. सारी जनसंवाद माध्यमे आहेत. या माध्यमाद्वारे होणारा संवाद हा अप्रत्यक्ष संवाद असतो. 

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...